चेन्नई : मद्रास उच्च न्यायालयाने अण्णा विद्यापीठात झालेल्या लैंगिक शोषणाच्या घटनेवर टिप्पणी करत या प्रकरणी ‘राजकारण’ केले जात असल्याचे म्हटले आहे. पट्टाली मक्कल काची (पीएमके)च्या वकिलाने या घटनेच्या विरोधात चेन्नईत प्रस्तावित निदर्शनांसाठी पोलिसांकडून अनुमती न मिळाल्याने चिंता व्यक्त केल्यावर न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे. अण्णा विद्यापीठातील लैंगिक शोषण प्रकरणाचे राजकीयीकरण होत असून महिलांच्या सुरक्षेवर कुणीच वास्तविक लक्ष देत नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. तर राष्ट्रीय महिला आयोगाने या घटनेच्या तपासासाठी दोन सदस्यीय सत्यशोधन समीत स्थापन केली आहे. या समितीने दोन दिवसांपर्यंत विद्यापीठाचा दौरा करत पीडिता, तिचे कुटुंबीय, विद्यापीठ प्रशासन अणि एनजीओंसोबत चर्चा केली. तसेच परिसराच्या सुरक्षा व्यवस्थांचा आढावा घेतला आहे. या समितीने एक विस्तृत अहवाल तयार केला असून यात कारवाईयोग्य शिफारसी सामील आहेत. 23 डिसेंबर रोजी 19 वर्षीय इंजिनियरिंगच्या विद्यार्थिनीचे अण्णा विद्यापीठ परिसरात लैंगिक शोषण झाले होते. आरोपीने प्रथम या विद्यार्थिनीवर मित्रावर हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले होते. यानंतर आरोपीने विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केले होते. पोलिसांनी 45 वर्षीय आरोपी ज्ञानशेखरनला अटक केली आहे.
Previous Articleबर्मुडा ट्राएंगलपेक्षा रहस्यमय सागरी भाग
Next Article चिन्मय दास यांचा जामीन फेटाळला
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









