खानापूर : येथील माऊतीनगरातील भाताच्या गवतगंजींना मंगळवारी दुपारी अचानक आग लागल्याने गुरव गल्ली येथील अशोक गुरव, नागेश गुरव या शेतकऱ्यांचे सुमारे 50 हजाराचे नुकसान झाले आहे. दुपारी गवतगंजींना अचानक आग लागली. यावेळी आगीने रौद्ररूप धारण केले होते. ही घटना जवळच्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. नागरिकांनीही कूपनलिकेचे पाणी सोडून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र भरदुपारी आग लागल्याने ती आटोक्यात आली नाही. त्यामुळे अशोक गुरव आणि नागेश गुरव या शेतकऱ्यांचे आठ ट्रॉली गवत जळून खाक झाले. या घटनेत त्यांचे 50 हजारांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या दक्षतेमुळे मोठा अनर्थ टळला. नगरसेवक गुंडू तोपिनकट्टी, अलीम नाईक यासह इतर कार्यकर्त्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.
Previous Articleझिरो पेंडन्सीसह आरोपी दत्तक योजना राबविणार
Next Article थर्टीफर्स्टनिमित्त मांसाहार खरेदीवर भर
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









