बंदराची क्षमता वाढवण्याठी 30 हजार कोटी रुपयांची
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बंदर विकासातली दुसऱ्या नंबरची मोठी कंपनी जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड येणाऱ्या काळात 30 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी करते आहे. बंदराची क्षमता वाढवण्याठी ही गुंतवणूक केली जाणार आहे.
आर्थिक वर्ष 2025-30 पर्यंत कार्गो वाहतुक क्षमता वाढवण्याचा प्रयत्न कंपनी करणार आहे. आर्थिक वर्ष 2030 पर्यंत मालवाहतुक क्षमता 400 दशलक्ष टन प्रति वर्ष करण्याचा इरादा कंपनीचा आहे. शुन्य कर्ज असणाऱ्या कंपनीने मालवाहतुकीत बंदर विकासाला अधिक प्राधान्य देणार आहे. यासाठी योग्य धोरण आखले जात आहे, असेही कंपनीने म्हटले आहे.









