पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शन
कोल्हापूर
राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
याप्रसंगी पर्यावरण मंत्री मुंडे म्हणाल्या, मी आज कॅबिनेट मंत्री झाल्यावर श्री अंबाबाईच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आली आहे. माझ्याकडे आलेलं खातं, हे या सृष्टीला वाचवण्यासाठी योगदान देणारं आहे. गेल्या वेळेस मी आले होते त्यावेळी कोल्हापूरला पूर आला होता. पर्यावरण खात्याच्या माध्यमातून येथे पूर कसं येणार नाही यासंदर्भात आम्ही प्रयत्न करणार आहे. याशिवाय प्रदूषण मुक्त नदी अंतर्गत पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी, मी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. मुंबई पुणे मेट्रोसिटी आहेत आणि येथे प्रदूषण वाढलेला आहे याचे अनेक कारण आहेत. या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात काम सुरू आहेत त्यामुळे हे काही काळासाठीचे प्रदूषण असेल. यामध्ये मी स्वतः लक्ष घालणार आहे. शिवाय अनेक कारखान्यांकडून प्रदूषण होत आहे याकडे मी लक्ष देणार आहे .
त्यांना साखरशाळांसंदर्भात विचारणा केली असताना, मी अद्याप आढावा घेतला नाही, मात्र ऊसतोड कामगारांची सोबत जात नाहीत गावातच राहतात. त्यांची तिथं राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था आहे. मी मराठवाड्यात झालेल्या सर्वेक्षण अद्याप पाहिलेला नाही ते कितपत खरं आहे हे मी आता पाहिलेला नाही. मात्र सरकारी शाळांचं शिक्षण सुधारण्यासाठी त्याच्या खात्याकडून योगदान झालं तर चांगलं होईल. शिक्षण पद्धतीमध्ये आणखी बदल करण्यात येतील, असे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.
बीड प्रकरणावर पर्यावरणमंत्री मुंडे म्हणाल्या, मी महालक्ष्मीच्या दारात आहे मी कुठेही असले तरी मी खोटे बोलणार नाही यासंदर्भात यासाठी एस आय टी लावण्यासाठी सर्वात आधी मी मागणी केली आहे. या क्रूर प्रकरणाविषयी मी तीव्र संताप व्यक्त केलेला आहे. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्यामुळे ते स्वतः जातीने लक्ष घालून न्याय देतील अशी मला खात्री आहे. गुन्हेगार कोण आहे हे मी सांगू शकत नाही यंत्रणा सांगतील ते तपास करत आहेत.









