बेळगाव : माता आणि शिशू मृत्यूमागे राज्य सरकारचा बेजबाबदारपणा दिसत असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी केला. सोमवारी त्यांनी जिल्हा रुग्णालयातील प्रसूतीगृहाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. विजयेंद्र पत्रकारांशी बोलताना म्हणाले, या ठिकाणी सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी आलो आहे. रुग्णालयातील भेटीमध्ये राजकारणाचा प्रश्नच उद्भवत नाही. गोरगरिबांवर अन्याय होत आहे. माता-शिशुंना जीव गमवावा लागत असल्याने सभागृहात याबाबत चर्चा करू, असे ते म्हणाले. पालकमंत्री, आरोग्यमंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी याकडे दुर्लक्ष करू नये. माता-शिशू मृत्यू प्रकरणाकडे सरकारने आता तरी लक्ष द्यावे. याकडे आपण सरकारचे लक्ष वेधणार असल्याचेही ते म्हणाले. या सर्व परिस्थितीला काँग्रेस सरकार कारणीभूत असल्याची टीका त्यांनी केली. काँग्रेस सरकार भ्रष्टाचाराकडे अधिक लक्ष देत आहे. त्यामुळे रुग्णालयांवर त्यांचे नियंत्रण नाही. औषध खरेदी करताना निकृष्ट दर्जाची औषधे खरेदी केली जात आहेत. त्यामुळे अनेकांना जीव गमवावे लागले आहेत, असेही ते म्हणाले.
Previous Articleमहानगरपालिकांमध्ये प्रभाग समित्या स्थापन करा
Next Article चला.., जयंती नदीचा प्रवाह पहायला !
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









