मुंबई : 2024 च्या रणजी हंगामातील येथे सुरू असलेल्या इलाईट अ गटातील सामन्यात आयुष म्हात्रेच्या दमदार नाबाद शतकाच्या जोरावर मुंबईला सुस्थितीत नेले. मुंबई आणि सेनादल यांच्यात हा सामना खेळविला जात आहे. या सामन्यात सेनादलाने पहिल्या डावात 240 धावा जमविल्या. त्यानंतर मुंबईने आपल्या पहिल्या डावाला सुरुवात केली. पण सेनादलाच्या नितीन यादवने रघुवंशी आणि सिद्धेश लाड या दोन फलंदाजांना लवकर बाद केल्याने मुंबईची स्थिती 2 बाद 29 अशी केविलवाणी झाली होती. वरुण चौधरीने कर्णधार रहानेचा 19 धावांवर त्रिफळा उडविला. म्हात्रे आणि श्रेयश अय्यर यांनी मुंबईचा डाव सावरला. म्हात्रेने 116 तरश्रेयश अय्यरने 6 चौकारांसह 47 धावा जमविल्या.
Previous Articleबंडखोर उमेदवार अर्चना घारेंची राष्ट्रवादीतून हकालपट्टी
Next Article आजचे भविष्य १५ नोव्हेंबर २०२४
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









