बेळगाव : रायबाग तालुक्यातील भेंडवाड येथे सुरू असलेले खासगी होलसेल भाजी मार्केट बंदची मागणी घटप्रभा परिसरातील व्यापाऱ्यांनी केली आहे. यासंबंधी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले.गेल्या 80 वर्षांपासून घटप्रभा येथे होलसेल भाजी मार्केट सुरू आहे. त्यामुळे नगरपालिकेला व सरकारला करही मिळतो. घटप्रभा येथून गोवा, महाराष्ट्र व कर्नाटकातील विविध जिल्ह्यांना भाजीपाला पुरवठा केला जातो. गेल्या तीन-चार वर्षांपासून रायबाग तालुक्यातील भेंडवाड येथे होलसेल भाजी मार्केट सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे घटप्रभा नगरपालिकेला नुकसान सोसावे लागत आहे. सरकारला जमा होणारा करही कमी झाला आहे. याची गंभीर दखल घेऊन खासगी भाजीमार्केट बंद करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. यमुनाप्पा व्होनकुप्पी, सत्याप्पा पुजारी, कुमार सनदी आदी व्यापाऱ्यांनी या निवेदनावर सह्या केल्या आहेत.
Previous Articleकृषी खात्यामार्फत निर्यात जागृती कार्यक्रम
Next Article मच्छेतील कचरा समस्येने नागरिक हैराण
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









