बेळगाव : शहापूर स्मशानभूमीतील शेडवरील पत्रे धोकादायक बनले होते. याबाबत ‘तरुण भारत’मधून आवाज उठविण्यात आला. नगरसेवक रवि साळुंखे यांनी महानगरपालिकेला पाठपुरावा केला. त्यांच्या तत्परतेमुळे तातडीने सोमवारी धोकादायक पत्रे हटविण्यात आले आहेत. तसेच येत्या पंधरा दिवसात नव्याने पत्रे घालण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. शहापूर स्मशानभूमीमधील पत्रे धोकादायक झाले होते. अनेक पत्रे लोंबकळत होते. त्याठिकाणी अंत्यविधी करणेही अवघड होते. चुकून एखादा पत्रा पडला तरी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. याबाबत नगरसेवक साळुंखे यांनी मनपा अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतर सोमवारी तातडीने महानगरपालिकेचे कर्मचारी दाखल होऊन धोकादायक पत्रे काढले, सध्या काही पत्रे घातले आहेत. या शेडवरील सर्वच पत्रे धोकादायक बनले आहेत. त्यामुळे येत्या पंधरा दिवसात तेथील सर्व पत्रे नव्याने घालण्यात येणार आहे. तसेच इतर समस्याही सोडविण्यात येणार आहेत.
Previous Articleकंग्राळी बुद्रुक परिसरात गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन
Next Article हरवलेला दागिना कचऱ्यात सापडला
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









