बेळगाव : महानगरपालिका विविध कारणांनी आर्थिक अडचणीत आली आहे. चुकीच्या निर्णयामुळे आज त्याचा फटका महानगरपालिकेला बसत आहे. त्यामुळे आता मनपाची माजी नगरसेवक संघटना जनहित याचिका दाखल करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच शहराची पाणीसमस्या दूर करण्यासाठी तिलारी डॅम येथील अतिरिक्त पाणी बेळगावला वळविण्यासाठी खासदार जगदीश शेट्टर यांच्याशी चर्चा करण्याचे ठरविण्यात आले आहे. मनपा माजी नगरसेवक संघटनेच्या गुरुवारी घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये विविध विषयांवर गांभीर्याने चर्चा करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे 20 कोटीचे प्रकरण हे गंभीर आहे, ते वाचविणे महत्त्वाचे आहे. याचबरोबर शहरात विविध समस्या भेडसावत आहेत. त्या दूर करण्यासाठी आता माजी नगरसेवक संघटना पुढाकार घेणार आहे. भूसंपादन न करताच स्मार्टसिटी अंतर्गत रस्ता करण्यात आला. घाईगडबडीत घेतलेले हे निर्णय महानगरपालिकेच्या अंगलट आले आहेत. त्यामुळे आता मनपा माजी नगरसेवक संघटना त्याविरोधात आवाज उठविणार असल्याचे सांगण्यात आले. बैठकीला माजी महापौर शिवाजी सुंठकर, मालोजी अष्टेकर, माजी आमदार रमेश कुडची, दीपक वाघेला, अॅड. अमर येळ्ळूरकर, सुधा भातकांडे, शिवनगौडा पाटील, संजीव प्रभू आदी उपस्थित होते.
Previous Articleचक्क स्मशानभूमीत नवीन ट्रॅक्टरची पूजा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









