बेळगाव : शास्त्रीनगर परिसरात दूषित पाणी पुरवठा होत असल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली असून त्याकडे एलअँडटी कंपनीने लक्ष देऊन शुद्ध पाणी पुरवठा करावा, अशी मागणी शास्त्रीनगर परिसरातील नागरिकांकडून होत आहे. सोमवारी अचानक नळांना दूषित पाणी आल्यामुळे समस्या निर्माण झाली. त्यामुळे टँकरचा आधार घ्यावा लागला आहे. शास्त्रीनगर तिसरा क्रॉस परिसरामध्ये सोमवारी नळांना काळे पाणी आले. त्यामुळे पाणी भरणे तसेच टाकीमध्ये सोडणे अवघड झाले. काही जणांना उशिराने ही माहिती मिळाल्याने टाकीमध्ये पाणी सोडले होते. ती पूर्ण टाकी खाली करावी लागली. यामुळे येथील रहिवाशांना सोमवारी मोठा त्रास सहन करावा लागला. याबाबत एलअँडटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले. मात्र त्या अधिकाऱ्यांनी पाहणी करण्याचे आश्वासन दिले आहे. पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे समस्या निर्माण होत आहे. यातच अशाप्रकारे दूषित पाणी पुरवठा होत असल्याने आणखीनच गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तेव्हा तातडीने एलअँडटी कंपनीने दुरुस्ती करून शुद्ध पाणी पुरवठा करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
Previous Articleबेळगाव-गोवा रेल्वेमार्ग धिम्यागतीने सुरू
Next Article वकील खून प्रकरणी बार असोसिएशनचा कामकाजावर बहिष्कार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









