सांबरा : बेळगाव-सांबरा मार्गावरील बाजूपट्ट्या ठिकठिकाणी खचल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. तरी संबंधित खात्याने तातडीने बाजूपट्ट्यावर भराव टाकावा अशी मागणी जोर धरू लागली आहे . बेळगाव-सांबरा रस्त्यावर दररोज वाहनांची जास्त वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्याची देखभाल करणे गरजेचे आहे. सध्या मुतगे येथे या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. मुख्य रस्त्यावर लहान-मोठे खड्डे पडले आहेत. गावच्या बसथांब्यानजीकच्या रस्त्याच्या बाजूपट्ट्या मोठ्या प्रमाणावर खचल्या आहेत. नजीकच शाळा असल्याने येथून विद्यार्थ्यांचे येणे-जाणे असते. या रस्त्यावरून जाणाऱ्या नवीन वाहनचालकांना खचलेल्या बाजूपट्ट्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याचा जास्त संभव आहे. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने बाजूपट्ट्यांची दुऊस्ती करावी अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.
Previous Articleदेवाचीहट्टी पूल दुसऱ्यांदा पाण्याखाली
Next Article बाळगमट्टीतील पूल वाहून गेल्याने शेतकरी हतबल
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









