बेळगाव : आरपीडी चौकातून भरधाव येणारी वाहने अनगोळ तसेच तिसरे रेल्वेगेटकडे निघून जातात. बऱ्याच वेळा अनगोळ येथून येणारी वाहने रस्त्यामध्ये आल्याने अपघात होत आहेत. त्यामुळे अनगोळ नाका परिसरात गतिरोधक घालावेत, अशी मागणी चालकांमधून होत आहे. अनगोळ नाका, तिसरे रेल्वेगेट परिसरात गतिरोधक नसल्याने भरधाव वेगाने वाहने ये-जा करीत आहेत. याचा फटका शालेय विद्यार्थी व वयोवृद्धांना बसत आहे. अनगोळ परिसरातील बरेच विद्यार्थी टिळकवाडी येथील शाळांना जातात. त्यांना रस्ता ओलांडून जावे लागते. परंतु, भरधाव वाहनांमुळे रस्ता ओलांडणे कठीण ठरत आहे. आरपीडी कॉर्नरपासून येणारी वाहने भरधाव तिसऱ्या रेल्वेगेटकडे निघून जातात. त्यामुळे अनगोळ नाक्यावरून येणारी वाहने व पादचाऱ्यांना तेथेच थांबावे लागते. बऱ्याच वेळा रस्ता ओलांडताना भरधाव वाहनांमुळे अपघातही होत आहेत. त्यामुळे अनगोळ नाका परिसरात गतिरोधकाची गरज आहे. एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने या ठिकाणी गतिरोधक घालावे.
Previous Articleखानापूर शहराजवळील मलप्रभा नदीचे पात्र दूषित
Next Article महसूल खात्यातील रिक्तपदे लवकरच भरणार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









