बेळगाव : अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी बाजारात पणत्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राणप्रतिष्ठापना सोहळा दिवाळीच्या धर्तीवर साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे पणत्यांना बाजारात मागणी वाढली होती. घरगुती नागरिकांबरोबर सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात पणत्यांची खरेदी केली. दिवाळीच्या सणाला पणत्यांची मागणी तेजीत असते. मात्र, अयोध्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी बाजारात पणत्यांची रेलचेल पहावयास मिळाली. लहान पणत्या 10 ते 20 रुपये डझन तर मोठ्या 100 रुपये डझन याप्रमाणे दर होते. सार्वजनिक मंडळे आणि देवस्थान ट्रस्टने 1 ते 2 हजार डझन इतक्या पणत्या खरेदी केल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. प्राणप्रतिष्ठापना सोहळा जल्लोषात साजरा करण्यासाठी नागरिकांची खरेदी वाढली आहे. भगव्या टोप्या, पताका, फटाके आणि त्याबरोबर दीपोत्सवासाठी दिव्यांची खरेदी अधिक झाली. बेळगावबरोबर गोवा आणि कोकण येथूनदेखील खरेदीसाठी नागरिक दाखल झाले होते. मंदिरे, घरे दिव्यांनी सजविण्यासाठी आबालवृद्धांसह साऱ्यांचाच उत्साह शिगेला पोहोचला होता. त्यामुळे दिव्यांची अधिक खरेदी झाली.
Previous Articleप्रतिष्ठापनेनिमित्त तालुक्यात प्रभू श्रीरामाचा जयघोष
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









