बेळगाव : प्रकल्प सुरू होऊन वर्ष उलटले तरी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पाला शेवटी मुहूर्त मिळाला आणि मंगळवारी प्रकल्पाचे उद्घाटन पार पडले. जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेने एपीएमसी येथे ओल्या कचऱ्यापासून 200 युनिट वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प सुरू करून वर्ष उलटले. परंतु त्याचे उद्घाटन प्रलंबित होते. मंगळवारी राज्याचे पालिका प्रशासन मंत्री रहीम खान यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून आमदार राजू सेठ, महापौर शोभा सोमणाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, जिल्हाधिकारी नितेश पाटील व मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी उपस्थित होते. महानगरपालिकेकडून विविध प्रभागातील 500 किलो म्हणजेच अर्धाटन ओल्या कचऱ्याची स्वयंपाकाच्या गॅससाठी निर्मिती केली जात असून त्यातून 1 ते 2 व्यावसायिक सिलिंडर भरले जातात. हे सिलिंडर सरकारी योजनेंतर्गत चालविल्या जाणाऱ्या इंदिरा कॅन्टीन, हॉस्टेल आणि निराश्रीत केंद्रांना पाठविले जातात. तसेच एपीएमसी येथील प्रकल्पांतर्गत 200 युनिट वीजनिर्मितीचा उपयोग एपीएमसीमधील सुमारे 75 पथदिपांसाठी करण्यात येतो. उद्घाटनप्रसंगी रहीम खान यांनी ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचा हा प्रकल्प राज्यात आणि बहुदा देशात पहिलाच असावा, असे सांगून प्रशासन व महानगरपालिका अधिकाऱ्यांची प्रशंसा केली.
Previous Articleएस. आर. वॉरिर्यस संघाकडे जैन चषक
Next Article बेळगाव-बाची मार्गावर भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









