महेश सारंग आणि संजू परब हे वॉरियर्स जिंकण्यासाठी रणांगणात उतरलेत
सावंतवाडी : प्रतिनिधी
रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांमध्ये ६ लाख हक्काची मते आहेत. त्यामुळे भाजपच्या कमळ या चिन्हावरीलच खासदार निवडून येईल असा विश्वास कणकवली- देवगडचे भाजपा आमदार नितेश राणे यांनी सावंतवाडी येथे व्यक्त केला. ते महाविजसय संकल्प २०२४ अभियानांतर्गत आयोजित समारंभ प्रसंगी सावंतवाडीत आले असता बोलत होते. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर ,एकनाथ नाडकर्णी ,राजन म्हापसेकर ,संदीप मेस्त्री ,श्वेता कोरगावकर ,चेतन चव्हाण ,जिल्हा उपाध्यक्ष संजू परब ,मंडल अध्यक्ष रवींद्र मडगावकर, महेश धुरी ,प्रथमेश तेली, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे ,दिलीप भालेकर आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, उमेदवार कोण असेल हे वरिष्ठ ठरवतील.पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडून आणणे आणि महायुतीचाच खासदार विजयी करण्यासाठी भाजपचे वॉरियर्स तयार आहेत. कमळ चिन्हाचाच खासदार असावा अशी भावना कार्यकर्त्यांची आहे. ही भावना वरिष्ठापर्यंत पोहोचवण्यात आली आहे. यावेळी त्यांनी उबाठाचे खासदार विनायक राऊत यांना यापुढे खासदार म्हणून ठेवणार नाही भविष्यातील खासदार महायुतीचाच दिसेल. शत प्रतिशत भाजप असेल. भारतीय जनता पार्टी आगामी काळातील निवडणुकांमध्ये विजयी होण्यासाठी सुपरवॉरियर्सची नेमणूक करण्यात आली आहे. हे वॉरियर्स म्हणजे महेश सारंग आणि संजू परब पॅटर्न असून भाजपची ताकद कमी न होता. पक्ष जिंकला पाहिजे . या भूमिकेतून रणांगणात उतरले असल्याचे त्यांनी सांगितले. किरण सामंत यांच्या स्टेटस बाबत विचारले असता सामंत यांचा राग पवारांवर होता त्यांचा भाजप वर राग नसल्याचे ते म्हणाले त्यांनी भारतीय जनता पार्टीत यावे याचा त्यांनी पुनः रुचार केला. सुपर वॉरिअर्स आणि मेरी मिट्टी मेरा देश संकल्पना जिल्हा भरात राबविण्यात येणार आहे असेही ते म्हणाले .









