वेंगुर्ले ट्रफिक पोलीसांनी केले होती कारवाई
वेंगुर्ले (वार्ताहर)-
मोटार वाहन अँक्टचे उल्लंघन करणाऱ्या ३२ जणांवर वेंगुर्ले पोलिसांनी कारवाई करत न्यायालयात पाठविण्यात आलेल्या संबधितांवर दंडात्मक कारवाई करून दंड जमा करण्यात आला आहे. वेंगुर्ले तालुक्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वेंगुर्ले पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रफिक पोलीस मनोज परूळेकर व गौरव परब यांनी कारवाई केली. या कारवाईत रहदारीचा अडथळा केल्या प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम २८३ नुसार टेम्पो, रिक्षा व मोटर सायकल अशा १४ वाहनांवर, रस्त्याच्या परीस्थिीतकडे दुर्लक्ष करून वाहन वाहातुक करणाऱ्या कलम २७९ नुसार टेम्पो, डम्पर व मोटर सायकल अशा ३ जणांवर, मोटर अधिनियम १८५ चे उल्लंघन म्हणजे दारू पिऊन दारूच्या अंमलखाली वाहन चालविणाऱ्या १२ मोटर सायकलवर, मोटर वाहन कायदा १८४ प्रमाणे आपल्या ताब्यातील वाहन बेदरकारपणे चालविणाऱ्या १ टेम्पो तर नशेत वाहन चालविणाऱ्या दोघांवर उपविधी ८४ अन्वये दारूच्या नशेत आढळलेल्या दोघांवर वाहतूक पोलीसांनी कारवाई करीत ही प्रकरणे न्यायालयात पाठविली होती.
या सर्व प्रकरणात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी सर्वांवर न्यायालयाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली असून दंड रक्कम भरून घेण्यात आली आहे. गणेशोत्सव काळातही वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तसेच ट्रीपलसीट वाहन चालवित असताना ,कानाला मोबाईल लावून संभाषण करणाऱ्यांवरही आता ट्रफिक पोलीसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. तसेच अल्पवयीन मुले वाहन चालविताना आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे .
वेंगुर्ले तालुक्यातील वाहनचालकांनी वाहतुक नियमांचे पालन करावे. तसेच वेंगुर्ले शहरात नगर परीषद व पोलिसांकडून पार्किंगसाठी केलेल्या जागांच्या ठिकाणी वाहने लावावीत .वाहतूकीस अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी किंवा रस्त्याच्या कडेला वाहने उभी करु नयेत. त्यासाठी सर्व प्रकारच्या वाहन धारकांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी केले आहे.









