कोलंबो : श्रीलंकेत सुरू असलेल्या आर्थिक संकटादरम्यान भारत त्याला सर्वप्रकारे मदत करणे सुरूच ठेवणार असल्याचे विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले आहे. श्रीलंका-भारत पार्लमेंट्री फ्रेंडशिप असोसिएशनच्या सदस्यांना जयशंकर यांनी संबोधित केले आहे. भारत आणि श्रीलंकेचे संबंध दृढ करण्यासाठी आम्ही प्रत्येक क्षेत्रात काम करत आहोत असे त्यांनी म्हटले आहे. या कार्यक्रमाला श्रीलंकेतील भारताचे राजदूत गोपाळ बागळे संसदेत उपस्थित होते. दोन्ही देशांदरम्यान अन्नसुरक्षा, ऊर्जासुरक्षा, चलन सहाय्य आणि दीर्घकालीन गुंतवणुकीच्या क्षेत्रांमधील भागीदारी वाढणार असल्याचे उद्गार बागळे यांनी काढले आहेत. श्रीलंकेच्या आर्थिक संकटावेळी भारताने केलेल्या मदतीचा श्रीलंकेच्या खासदारांनी उल्लेख केला.
Previous Articleअभ्यासाचा ध्यास असावा तर असा!
Next Article लाईव्ह लोकेशन शेअरिंगची ईव्ही स्कूटर भारतीय बाजारात
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









