बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विनोद गायकवाड उपस्थित होते. अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे होते. व्यासपीठावर उद्योजक विजय कंग्राळकर, राजीव साळुंखे, अभियंता संग्राम गोडसे, दीपक किल्लेकर, रेणुका सप्रे, शिवराज पाटील, जी. जी. कानडीकर उपस्थित होते. डॉ. विनोद गायकवाड व इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. शिवराज पाटील यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सृष्टी आपटेकर, सोनाली पाटील, वैशाली वाडीन्नावर, तन्वी पाटील, श्रावणी कंग्राळकर, साईराज पाटील, कृष्णा मुरकुटे, श्रेयस घाडी, कृपा जाधव, अवंती कणगुटकर, काजल गावडे यांच्यासह एकूण 147 विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वर लगाडे यांनी तर संग्राम गोडसे यांनी आभार मानले. यावेळी राजू पावले, दत्तात्रय जाधव, मोहन सप्रे, एस. ओ. जाधव, आर. बी. बांडगी यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
Previous Articleकिसान सन्मान योजना निरंतर सुरू ठेवण्याची शेतकऱ्यांची मागणी
Next Article महिलेचा जीव वाचवणाऱ्या पोलिसाचे सर्वत्र कौतुक
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









