रामनाथी-कवळे येथे वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशनाला प्रारंभ
फोंडा : भारतात हिंदु 80 टक्के असूनही जात, पात, प्रांत यात विभागलेले आहेत. सन 1790 मध्ये या भारतात हिंदुची संख्या जवळपास 100 टक्के होते. मुघलांच्या आक्रममणाने ती घटत गेली. पुर्वीच्या लढाई तलवारीच्या बळावर लढल्या गेल्या आज आर्थिक स्तरावर लढाई देताना हलाल, जिहाद च्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्र, व्यवसाय मुसलमान ताब्यात घेत आहेत. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी प्रत्येक व्यवसायात हिंदुना जोडून आपली आर्थिक शक्ती वाढवून त्याला उत्तर द्यावे लागेल. असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी केले. कवळे येथील श्री रामनाथ देवस्थान वैश्विक हिंदु राष्ट अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. या अधिवेशनात देश विदेशातून तसेच भारतातील तसेच भारतातील विविध राज्यांतील 312 हून अधिक हिंदु संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. गुरूवार 22 जून पर्यंत हे अधिवेशन चालणार आहे.
हिंदु शक्ती हिंदु राष्ट्र निर्माणासाठी-सद्गुरू डॉ. चारूदत्त पिंगळे
यावेळी मार्गदर्शन करताना राष्ट्रीय मार्गदर्शक हिंदु जगजागृती समितीचे डॉ. चारूदत्त पिंगळे म्हणाले की खलिस्तानचा आतंकवाद, श्रीरामनवमी, हनुमानजयंती अशा सणांना दंगलीला वाढलेल्या आहेत. समलिंगी विवाहाचे समर्थन, लिव्ह ईन रिलेशनशीपच्या वैभिचाराला मान्यता अश्लीलतेचे वाढते प्रस्थ, अनैतिकतेला संवैधानिक करण्याचे प्रयत्न यासह अनेक आव्हाने सध्या हिंदुसमोर आहेत. या सर्व समस्यांवर सेक्युलर राज्यव्यवस्थेत कोणतेही उत्तर नसून शाश्वत हिंदु राष्ट्र हेच त्यावर उत्तर आहे. सनातन धर्मदर्शनात हिंदु विश्वाचा म्हणजेच वैश्विक हेंदु राष्ट्राचा विचार आहे. त्यामुळे हा महोत्सव म्हणजे एक लोकमंथन आहे. या लोकामंथनातून एकत्रित आलेली ही हिंदु शक्ती पुढे हिंदु राष्ट्र निर्माणाच्या विश्वकल्याणकारी कार्यासाठी जोडली जाणार आहे,असे प्रतिपादन सद्गुरू डॉ. चारूदत्त पिंगळे यांनी केले. यावेळी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची अनमोल आठवण’ खंड 1 साधना प्रत्यक्ष शिकवण्याच्या पद्धती या हिंदी आणि मराठी या ग्रंथाचे भगवताचार्य श्री राजीवकृष्णजी महाराज झा, पू.भागिरथी महाराज, पू रामज्ञानीदास महात्यागी महाराज, अधिवक्ता पू. हरिशंकर जैन, महंत दिपक गोस्वामी यांच्याहस्ते तर ठाणे महाराष्ट्र येथील श्री दुर्गेश परूळकर यांच्या महाभारतातील अलौकीक चरित्रे खंड 1 निष्काम कर्मयोगी भीष्म या ग्रंथाचे श्री दुर्गेश परूळकर,डॉ. चारूदत्त पिंगळे, केरलीय क्षेत्र परिपालन समितीचे आचार्य पी.पी.एम नायर प.पू. यतीमॉ चेतनानंद सरस्वती यांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले. अधिवेशनाचा प्रारंभ शंखनादाने आणि मान्यवरांच्याहस्ते दिप प्रज्ज्वलनाने करण्यात अले. दिपप्रज्ज्वलनानंतर वेदमंत्रांचे पठण झाले. याप्रसंगी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्dराह्म डॉ. जयंत आठवले. यांनी दिलेल्या संदेशाचे वाचन सद्गुरू सत्यवान कदम यांनी केले.









