पणजी : मुंबई उच्च न्यायालयाने कचराप्रश्नी कडक भूमिका घेतली असून सेंट लॉरेन्स आणि भाटी या दोन पंचायतींना मोठ्या रकमेचा दंड ठोठावला आहे. शिवाय दोन्ही पंचायतींच्या सरपंचांनी न्यायालयासमोर हजर राहावे, असा आदेश बजावला आहे. कचरा व्यवस्थापनाच्या विषयावरील जनहित याचिका उच्च न्यायालयात सुनावणीस आली असता हा आदेश देण्यात आला आहे. कचरा गोळा कऊन त्याचे व्यवस्थापन करणे, विल्हेवाट लावणे हे काम सदर दोन्ही पंचायतींनी केले नसल्याचे न्यायालयाने निदर्शनास आणले. म्हणून त्या दोन्ही पंचायतींना प्रत्येकी ऊ. 5 लाखाचा दंड केला असून तो 15 दिवसात भरण्यास सांगितले आहे. शिवाय ती सुविधा दोन्ही पंचयतींनी 15 दिवसात सुरू करावी, असेही सूचित केले आहे.
Previous Articleडीएचईची गुणवत्ता यादी आज होणार जाहीर
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









