खानापूर : मोदी देशाचे नेतृत्व करत असल्यापासून देशाने विकासाभिमुख दृष्टिकोन ठेवून गाव पातळीपासून विकासास प्राधान्य देण्यात येत आहे. यासाठी तालुक्यातील मुलभूत तसेच जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी भारतीय जनता पक्षाला मतदान करावे, असे आवाहन विठ्ठल हलगेकर यांनी गुंजी येथील मतदारांशी संवाद साधताना कोपरा सभेत व्यक्त केले. गुंजी येथे पदयात्रा काढून मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या. तसेच मतदारांच्या अडीअडचणी ऐकूण घेण्यात आल्या. त्यानंतर कोपरा सभा घेण्यात आली. य् ाावेळी माजी आमदार अरविंद पाटील म्हणाले, तालुक्यात सर्वसामान्यांच्या हाकेला साद देणारा आमच्यातील माणूस नेतृत्व करणे गरजेचे आहे. यासाठी विठ्ठल हलगेकर हे सामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्त्व असून भाजपसारख्या विकासाभिमुख पक्षातून ते निवडणूक लढवत आहेत. मोदींचे हात बळकट करण्यासाठी विठ्ठल हलगेकर यांना निवडून देणे गरजेचे आहे. यासाठी गुंजी भागातील मतदारांनी कोणत्याही पक्षाच्या भुलथापाला बळी न पडता भाजपला मतदान करून विठ्ठल हलगेकर यांना प्रचंड मताने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. राज्य कार्यकारिणी सदस्य धनश्री सरदेसाई म्हणाल्या, महिलांच्या हाती परिवर्तनाची क्षमता आहे. यासाठी महिलांनी देशाच्या धर्माचा भवितव्याचा विचार करून भाजपला मतदान करावे. भाजपने महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी तसेच त्यांना स्वाभिमान मिळवून देण्यासाठी विविध उपाययोजना केलेल्या आहेत, असे त्या म्हणाल्या. यावेळी बाबुराव देसाई, धनश्री सरदेसाई, शामसुंदर गायकवाड यांची भाषणे झाली. गुंजी, माणिकवाडी, नायकोल, करंबळ, गंगवाळी, शिंदोळी, सावरगाळी यासह या भागातील अनेक गावातून प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी मतदारांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला.
Previous Articleखानापुरात जाहीर प्रचाराची सांगता
Next Article महाविकास आघाडीकडून अजितदादा टार्गेट
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









