मजगाव : मजगाव येथे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून पाण्यासाठी बोअरवेलना कुलूप लावत असल्याने सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. एक टँकर पाणी विकत घेण्यासाठी मोजावे लागत आहेत रुपये 600 ते 800. पावसाने ओढ दिल्याने मजगावातील सर्व विहिरीनी तळ गाठला आहे. गल्लोगल्लीत बोअरवेल आहेत. परंतु बोअरनासुद्धा पाणी नसल्याने गावातील निम्म्याहून अधिक बोअरवेल निकामी झाले आहेत. त्यामुळे घराशेजारील नागरिक बोअरवेलना कुलपे लावून स्वत:पुरता पाणी वापरत असल्याने सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून बोअर कुणाच्या मालकीची नाही हे पटवून सांगावे. तसेच मनपातर्फे टँकरने पाणीपुरवठा प्रत्येक गल्लीत करावा, अशी मागणी होत आहे.
Previous Articleभ्रष्ट विरोधकांना त्यांची जागा दाखवा
Next Article अंजली निंबाळकर यांना पारिश्वाड भागाचा भक्कम पाठिंबा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









