बेळगाव : उत्तर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आसिफ ऊर्फ राजू शेठ यांनी उत्तर मतदारसंघ पिंजून काढला आहे. प्रत्येक भागात घरोघरी जाऊन नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले. कॅम्प परिसरातदेखील प्रचारफेरी काढून मतदान करून विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सध्या राजू शेठ यांना सर्व परिसरातून पाठिंबा मिळत असून विजयी करण्याचा निर्धार मतदारांनी केला आहे. प्रत्येक विभागात प्रचारफेरी काढून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. गाठीभेटीप्रसंगी नागरिक विविध समस्यांचे गाऱ्हाणे सांगत आहेत. शिक्षण, नागरी सुविधा, गरजूंना घरकुल आणि 24 तास पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्यासह विविध विकासकामे पूर्ण करण्याच्या आश्वासन राजू शेठ यांनी दिले आहे. अलीकडेच कॅम्प परिसरात प्रचारफेरी काढून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी विविध युवक मंडळांनी राजू शेठ यांचे स्वागत करून उत्स्फूर्त पाठिंबा व्यक्त केला. येत्या निवडणुकीत आपले बहुमोल मत देऊन विजयी करण्याचा निर्धार यावेळी केला. प्रचाराफेरी वेळी कॅन्टोन्मेंटच सदस्य, विविध युवक मंडळाचे कार्यकर्ते आणि पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Previous Articleभाजपने आरक्षण काढल्याने विविध समाजांवर अन्याय
Next Article सीमाबांधवांसाठी ही निवडणूक नसून निकराची लढाई
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









