पुलवामा हल्ल्याबद्दल सत्यपाल मालिकांच्या प्रश्नावर खुलासा करा : पृथ्वीराज पाटील
सांगली : पुलवामा हल्ल्याबद्दल जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल, भाजपा नेते सत्यपाल मलिक यांनी खुलासा करूनही मौन बाळगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जाहीर निषेध करण्यासाठी काँग्रेसतर्फे ‘शर्म करो मोदी शर्म करो’ आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील व जिल्हा मध्यवर्ती बॅंक उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी केले.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले, भाजपचे वरिष्ठ नेते, जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटना व ३०० कोटींच्या ऑफरचा केलेला आरोप अत्यंत गंभीर आहे. सत्यपाल मलिक यांनी केलेले आरोप, भ्रष्टाचार व देशाच्या सुरक्षेच्यादृष्टीने अत्यंत चिंताजनक आहे. पुलवामा घटनेमध्ये ४० जवानांचे बळी गेले आणि त्यात सरकारची चूक असणे हे त्यांनी निदर्शनास आणून दिले. असे असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना गप्प राहण्यास सांगितले, असा थेट आरोप मलिक यांनी केला असून त्यांच्या आरोपांचे पंतप्रधान मोदींनी अद्यापही उत्तर दिलेले नाही
मलिक यांनी केलेल्या आरोपांमुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात संशय व संभ्रम निर्माण झाला आहे. यासाठी काँग्रेसच्या वतीने ‘शर्म करो मोदी शर्म करो’ हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले.
यावेळी नगरसेवक संतोष पाटील, बिपीन कदम, आशिष कोरी, नंदाताई कोलप, रविंद्र वळवडे, महावीर पाटील, अल्ताफ पेंढारी, मौलाली वंटमुरे, शितल सदलगे, विजय आवळे, आयुब निशानदार, सुशांत गवळी, अमित पारेकर, श्रीनाथ देवकर, माणिक कोलप, अमोल पाटील, राजेंद्र कांबळे, सुजित लकडे, उत्तम सुर्यवंशी, दिक्षीत भगत, गजानन आवळे आदि मान्यवर उपस्थित होते.









