बेळगाव : मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा हळूहळू वाढू लागला आहे. त्यामुळे थंड पेये, हिरव्या पालेभाज्या, शहाळे, आईस्क्रीम आणि इतर थंड पदार्थांना मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे लिंबू सरबत गाड्या, पाणपोई आणि कोल्ड्रींक्समध्ये गर्दी वाढू लागली आहे. दुपारच्या वेळेत उष्मा वाढू लागल्याने नागरिकांची पावले थंड पेयांकडे वळू लागली आहेत. दुपारच्या वेळेत शरीराची लाहीलाही होऊ लागली आहे. त्यामुळे पंखा आणि एसी यंत्रेदेखील पूर्ण क्षमतेने चालू झाली आहेत. वाढत्या उष्म्याने कलिंगड, द्राक्षे, सफरचंद आदी फळांची विक्रीदेखील वाढत आहे. दरम्यान, गरिबांचा फ्रिज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठाला मागणी वाढत आहे. शहरातील गोंधळी गल्ली, रामलिंग खिंड गल्ली, रामदेव गल्ली, खडेबाजार, गणपत गल्ली, पांगूळ गल्ली, नरगुंदकर भावे चौक, काकतीवेस, कोतवाल गल्ली आदी ठिकाणी पाणपोईची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेत नागरिक पाणपोईचा लाभ घेत आहेत. शिवाय व्यावसायिकांनीदेखील दुकानांसमोर पाणपोईची व्यवस्था केली आहे. तसेच कलिंगडांना मागणी वाढत आहे. दरम्यान, येत्या काही दिवसात पुन्हा उन्हाचा तडाखा वाढणार आहे. त्यामुळे पारा पुन्हा वाढेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.
Previous Articleसिलिंडरचे दर कमी करण्यासह कुत्र्यांचा बंदोबस्त करा
Next Article जिल्ह्यात 2 हजार हेक्टरात आंबा उत्पादन
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









