Soniya Gandhi : कॉंग्रेसच्या अखिल भारतीय अधिवेशनात सोनिया गांधी यांनी राजकीय निवृत्तीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मला आनंद आहे. माझा प्रवास राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रे दरम्यान संपला असे सूचक वक्तव्य आज त्यांनी केले. रायपूर अधिवेशनात सोनिया गांधींकडून प्रवासाच्या सांगतेचे संकेत देण्यात आले.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली २००४ आणि २००९ साली लोकसभा निवडणुकीत आपला विजय झाला. यामुळे मी वैयक्तिकरित्या समानाधी आहे. मात्र माझ्या प्रवासाचा समारोप काँग्रेससाठी टर्निंग पॉईंट ठरलेल्या ‘भारत जोडो यात्रे’ने झाला, याचे मला जास्त समाधान आहे, असेही सोनिया गांधी म्हणाल्या.
Previous Articleजाणून घ्या जिऱ्याच्या अतिसेवनाचे तोटे
Next Article कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान









