प्रतिनिधी /पणजी
वैश्विक स्वाध्याय कार्याचे प्रवर्तक पद्मविभूषण पांडुरंगशास्त्राr आठवले (दादा) यांच्या प्रेरणेने स्वाध्याय परिवारातील युवकांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव आगळ्यावेगळ्या पध्दतीने साजरा केला. भगवान श्रीकृष्णची जयंती केवळ दहीहंडी फ्ढाsडून न करता त्याचे विचार समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावेत या करता दादांनी युवकांना पथनाटय़ाची संकल्पना दिली. स्वाध्याय परिवाराची धुरा संभाळणाऱया श्रीमती धनश्री तळवलकर (दीदी) यांच्या मार्गदर्शनाखाली पथनाटय़ाच्या माध्यमातून लाखो युवक देशविदेशात हे विचार ‘दिखावे की दुनिया’ या पथनाटय़ातून घेऊन गेले. गोव्यातही पथनाटय़े झाली असून त्याला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
यंदा देशातील 20 राज्यात तसेच विदेशातील इंग्लंड, अमेरिका, पॅनडा, आफ्ढ्रिका, ऑस्ट्रेलिया या देशांत युवकांचे 14,500 गट म्हणजे दीड ते पावणे दोन लाखांहून अधिक युवकांनी ‘दिखावे की दुनिया’ या पथनाटय़ातून सर्वांना विचार करण्यास प्रवृत्त केले. विविध भाषांमधून ही पथनाटय़े 12 ते 19 ऑगस्ट या काळात सादर करण्यात आली. विशेष म्हणजे कोणत्याही प्रलोभनाशिवाय आपले शिक्षण, नोकरी, व्यवसाय सांभाळून व या सर्वातून वेळ काढून युवकांनी पथनाटय़े सादर केली. ‘आम्हांला असे वेगळे काही करायला वेळच नसतो’ असे जिथे जागोजागी ऐकू येते त्याच वयोगटातील युवक हा उपक्रम राबवितात हे विशेष.
आज समाजात सर्वत्र दिखाऊपणाचे वर्चस्व आहे, आपले संबंध मैत्री, नाती, आपला व्यवहार या सर्वच ठिकाणी एक प्रकारचा कृत्रिम दिखाऊपणा, ढोंग आणि रूक्षपणा आला आहे असे वाटते अशा दिखाऊ दुनियेतही ईश्वराला केंद्रस्थानी ठेवून एक निरपेक्ष, दैवी, दिखवा विरहीत संबंध निर्माण होऊ शकतो असा सांदेश हे पथनाटय़ देते. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलेले विचार इतके प्रभावी आहेत की ते जीवनात साकार झाल्यास व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र असा उत्तरोत्तर विकास होणे शक्मय आहे. मात्र हे प्रभावी विचार तरुणांना मिळत नाहीत, तरुणांपर्यंत पोहोचत नाहीत. कृष्णाचे विचार मिळाले तर आजचा युवक देखील केवळ स्वार्था न होता एक उन्नत, कृतज्ञ जीवन जगू शकतो असेच काहीसे विचार या पथनाटय़ातून पाहायला मिळतात. स्वाध्याय परिवाराच्या युवकांची जन्माष्टमी निमित्त सादर केलेली ही पथनाटय़े प्रत्येकाच्या मनात आशेचा एखादा किरण फुलवू शकतील हे नक्की !!









