सातारा: महाबळेश्वर तालुक्यातील पर्यटन स्थळांना असलेली ब्रिटिश अधिकाऱ्यांची नावे बदलून देशातील महान क्रांतिकरांची नावे देण्यात यावी अशी मागणी भाजप महाराष्ट्र प्रदेश सचिव विक्रम पावसकर यांनी केली आहे. त्याबाबतचे पत्र हे महाबळेश्वर तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
देशात स्वातंत्र मिळून ७५ वर्षे झाली तरीपण काही प्रश्न अजून मार्गी लागलेले नाहीत. जसं की इतके वर्ष झाले तरीही ब्रिटिश अधिकाऱ्यांची च नावे या स्थळांना आहेत. आपल्या देशाच्या स्वातंत्र्य साठी ज्यांनी आपले आयुष्य पणाला लावले त्यांची नावे आधीच लागायला पाहिजे होते. यंदाचे साल हे स्वातंत्र्य अमृत महोत्सव वर्ष आहे. त्याच पार्श्भूमीवर जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांना क्रंतीकरंची नावे देण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे.
Previous Articleयेळ्ळूर मारहाण खटल्याच्या सुनावणीला प्रारंभ
Next Article कार्डियाक रुग्णवाहिकेचा टायर फुटून अपघात









