नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (एनटीपीसी) च्या पुढाकाराने तेलंगणा या राज्यात देशातील सर्वात मोठा तरंगता सौरऊर्जा प्रकल्प आकाराला आला आहे. गेल्या शुक्रवारी त्याची घोषणा करण्यात आली होती. तेलंगणामध्ये असलेल्या रामगुंडम शहरात या प्रकल्पामुळे शंभर मेगावॅट विजेची निर्मिती होणार आहे. या प्रकल्पासाठी 423 कोटी रुपयांचा खर्च आला असून रामगुंडम सरोवरात त्याची बांधणी करण्यात आली आहे. हे सरोवर 500 एकर जागेत आहे. या प्रकल्पाचे चाळीस छोटे छोटे भाग असून प्रत्येक भाग 2.5 मेगावॅट वीज निर्माण करणारा आहे. या प्रकल्पामुळे दक्षिण भारतात तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून निर्माण होणाऱया विजेचे प्रमाण वाढणार असून ते 217 मेगावॅटपर्यंत पोहोचणार आहे. यापूर्वी एनटीपीसीने केरळमध्येही 92 मेगावॅट क्षमतेचा तरंगता सौरऊर्जा प्रकल्प साकारला आहे. तो कायमकुलम येथे 350 एकर जागेवर विस्तारला आहे. आंध्रप्रदेशातील सिंहाद्री येथेही 25 मेगावॅटचा असा प्रकल्प आहे. एनटीपीसी आता कोळसा उर्जेपेक्षा सौरऊर्जेवर अधिक भर देत असून 50 हजार मेगावॅट वीज सौर प्रकल्पातून निर्माण करण्याचे संस्थेचे ध्येय आहे. सरोवरात हा नवा प्रकल्प असल्याने सरोवरातील पाण्याचे बाष्पीभवन रोखले जाणार आहे. यामुळे पिण्यासाठी 32.5 लाख घनमीटर पाणी दरवषी अधिकचे उपलब्ध होणार आहे. या सौरऊर्जा प्रकल्पामुळे दरवषी 1 लाख 65 हजार टन कोळशाची बचत होणार असून कोळसा जाळल्यामुळे वातावरणात मिसळणाऱया विषारी वायूंचे प्रमाणही कमी होणार आहे.
Previous Articleमुरलीधर यांना सर्वोत्तम सेवा पुरस्कार जाहीर
Next Article मराठा इन्फंट्रीमधील 51 जवान देशसेवेत रुजू
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









