वसगडे / वार्ताहर
आमदार अरुण अण्णा लाड यांनी प्रथम माहिती घेऊन उघड्या डोळ्यांनी वक्तव्ये करावीत.इरिगेशन फेडरेशनच्या सांगलीतील मिटिंग मध्ये बोलताना राजू शेट्टींच्याबद्दल चुकीचे विधान करून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आ.लाड यांनी केला आहे. त्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज वसगडे ता. पलूस येथे पार पडलेल्या बैठकीत त्यांचा त्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा म्हणाले, कोल्हापूरमध्ये महावितरणच्याच्या मुख्य कार्यालयासमोर रस्त्यावर राजू शेट्टी शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा दहा तास लाईट मिळावी म्हणून १५ दिवस- रात्र ठाण मांडून बसले होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ व काँग्रेसचे मंत्री सतेज पाटील इरिगेशन फेडरेशन व शेतकरी कोणाला भेटून गेले ? हे आपणाला माहीत नाही. त्यावेळी तुम्ही कुठे गायब होता? त्या ठिय्या आंदोलनाची दखल घेऊन ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी राजू शेट्टींना मुंबईला मिटिंगसाठी बोलवलं होतं व दिवसा दहा तास कशाप्रकारे लाईट देता येईल यासाठी तात्काळ कमिटी नेमली. त्यावेळी त्या मिटिंगला आपण सुद्धा होता. त्यावेळी आपण मध्ये बोलताना ऊर्जामंत्री आपल्याला काय बोलले हे सुद्धा जनतेला कळू दे. ज्या थोर स्वातंत्र्य सेनानी क्रांतिवीर जी.डी. बापूंनी आपलं संपूर्ण आयुष्य शेतकरी प्रश्नावर घालवलं आपण त्यांचे वारसदार आहात स्वतःच्या स्वार्थासाठी आपण कोणाची भाषा बोलत आहात. इथे राजू शेट्टी दिवसा लाईट मागतात आणि आपण रात्रीची लाईट मागत आहात. हे समजणे इतका शेतकरी खुळा नाही. तुम्ही सरकार मध्येच आहात. सरकार तुमचेच आहे. मग तुम्ही आंदोलन कोणाच्या विरोधात करणार? हे एकदा जनतेला सांगा असे आवाहन राजाेबा यांनी केल आहे.
एक रकमी एफ आर पी देतो म्हणून धादांत खोटं बोलून शेतकऱ्यांच्या पोरांची मत आमदारकी साठी गोळा करून आपण पदविधर आमदार झाला आहात. यावेळी तुम्हाला राजू शेट्टी दिसत होते मग आत्ताच कसे दिसत नाही? शेतकऱ्यांबद्दलचे तुमचे पुतणा-मावशीचे प्रेम सर्व जनतेला माहित आहे. आमदार साहेब परिस्थिती ची माहिती घेऊन बघून बोला व आरोप करा. जर आपणाला शेतकऱ्यांच्या बद्दल कळवळा असेल तर १ मे महाराष्ट्र दिनाच्या ग्रामसभेमध्ये शेतीला दिवसा दहा तास वीज व पिकांना एक रकमी हमी भाव मिळावा असा ठराव करावा. कारण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून तसेच सांगली-कोल्हापूर-सातारा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन राष्ट्रपतींना भेटणार आहेत.
त्याची सुरुवात आपण कुंडल ग्रामपंचायतीपासून स्वर्गीय जी डी बापू यांच्या समाधीचे दर्शन घेऊन करुया असे आवाहन राजोबा यांनी केले आहे. या बैठकीसाठी पलूस तालुका अध्यक्ष बाळासो शिंदे, युवा आघाडीचे अध्यक्ष धन्यकुमार पाटील, रोहित पाटील, अशोक शिंदे, विजय चौगुले विजय पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.









