उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्हय़ाच्या तिलोई विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार मनकेश्वर शरणसिंग यांच्या एका विधानाने जोरदार खळबळ उडाली आहे. ‘या देशातील हिंदू जागा झाला तर दाढीची शेंडी होण्यास वेळ लागणार नाही’, असे म्हणून त्यांनी नवीन वाद निर्माण केला आहे. त्यांनी पुढे असेही म्हटले आहे, की ‘भारतात रहायचे असेल तर ‘राधे राधे’ असा जप करावा लागेल. त्याची तयारी नसलेल्या लोकांनी पाकिस्तानात निघून जावे.’ त्यांच्या या वक्तव्याने विरोधी पक्ष संतप्त झाले असून त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा विचार चालविला आहे. या निवडणुकीत एकंदरीतच धर्म आणि जात यांच्या आधारावर उघडपणे मतदारांना मतदान करण्याचे आवाहन सर्वच पक्षांकडून केले जात आहे.
Previous Articleप्रचार करताना उमेदवाराच्या डोळय़ात आसू
Next Article अक्षयचा ‘बच्चन पांडे’चा ट्रेलर रिलीज
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









