प्रतिनिधी / विटा
विटा नगरपालिकेने सातत्यपूर्ण कामगिरी करीत स्वच्छ सर्वेक्षण अभियानात पुन्हा एकदा धवल यश मिळवले आहे. यावेळी नगरपालिकेने स्वच्छ शहर म्हणून देशात पहिल्या स्थानावर येण्याचा मान पटकावत शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. शहरातील नागरिकांच्या सहकार्यानिच नगरपालिका स्वच्छ शहरात देशात पहिली आल्याची माहिती स्वच्छतेचे ब्रॅण्ड अम्बेसिडर वैभव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
“स्वच्छ सर्वेक्षण अभियानात विटा नगरपालिकेने सातत्याने यश मिळवले आहे. गतवर्षी पहिल्या चार मध्ये चमकलेल्या विटा नगरपालिकेने त्याचवेळी देशात येण्याचा संकल्प केला होता. शहरातील नागरीकांच्या सततच्या प्रयत्नांना यश मिळाले असून विट्याचा स्वच्छ शहर म्हणून देशात पहिला क्रमांक आला आहे. आपण देशातील सर्वात स्वच्छ शहरात रहात असल्याचा अभियान शहरातील हर एक नागरिकांना वाटत आहे. अशा शब्दात माजी नगराध्यक्ष पाटील यांनी याबाबतची माहिती दिली. यावेळी उपनगराध्यक्ष सुभाष भिंगारदेवे, माजी उपनगराक्ष किरण तारळेकर दहावीर शितोळे, विजय जाधव , पाटील, प्रशांत काबळे, मंगेश हजारे, भरत काळे, गजानन निकम, अविनाश चौधे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
दिल्ली येथील विज्ञान भवनात होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते विटा नगरपालिकेचा गौरव होणार आहे. देशातील स्वच्छ शहरामध्ये महाराष्ट्रातील विटा पालिका पहिली, लोणावळा दुसरी आणि सासवड नगरपालिका तिसरी आली आहे. यामुळे देशाच्या पटलावर महाराष्ट्राने ही मोठी उपलब्धी केली आहे, असेही वैमव पाटील यांनी यावेळी नमूद केले. आगामी काळात रोल मॉडेल म्हणून चिटा शहराकडे पाहिले जाणार आहे. त्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली आहे. त्यासाठी सर्वांनी जबाबदारीने काम केले पाहिजे असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
शहर स्वच्छतेच्या अभियानाची सुरुवात करताना तत्कालीन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी मोठे योगदान दिले होते. त्यांची बदली झाल्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागणार अस वाटत होते मात्र नुतन मुख्याधिकारी अतुल पाटील यानी त्याच गतीने काम केले, असा आवर्जून उल्लेख माजी नगराध्यक्ष पाटील यांनी केला शहर स्वच्छतेत योगदान देणाऱ्या स्वच्छता कर्मचान्यांचा सन्मान कावा. त्यांच्या योगदानाचे देशात कौतुकासासाठी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात एका स्वच्छता कर्मचारी प्रतिनिधीला बरोबर नेणार आहे. यातून देशभरात चागला संदेश देण्याचा विटा नगरपालिका प्रयत्न असेल असे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी सांगितली.








