वृत्तसंस्था/ वायनाड
केरळमधील वायनाड जिल्ह्यात शुक्रवार, 25 ऑगस्ट रोजी झालेल्या एका रस्ते अपघातात सुमारे 9 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये बहुतांश महिलांचा समावेश आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कामगारांना घेऊन जाणारी जीप 25 मीटर खोल दरीत कोसळल्याने 9 जणांना जीव गमवावा लागला. तसेच जीप चालकासह तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघाताच्या वेळी जीपमधून चालकासह एकूण 13 जण प्रवास करत होते.
मन्नतवाडी येथील थाविनहाळ ग्रामपंचायत हद्दीत हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्या दोघांना मन्नतवाडी वैद्यकीय महाविद्यालय ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर एका गंभीर जखमीला जिल्हा रुग्णालयात अधिक उपचारार्थ पाठविण्यात आले आहे. अपघातात ठार झालेले सर्वजण वायनाड जिह्यातील रहिवासी असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
Previous Articleसप्ताहातील अंतिम सत्रात बाजार नुकसानीत
Next Article शब्दोत्सव……3
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









