मुंबई
मागच्या आठवड्यामध्ये दहा पैकी तीन कंपन्यांच्या बाजार भांडवलामध्ये 82 हजार कोटी रुपयांची घट झाली असल्याचे दिसून आले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बाजार भांडवलामध्ये सर्वाधिक घसरण दिसली आहे. आघाडीवरच्या दहा कंपन्यांमध्ये पाहता रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक व स्टेट बँक ऑफ इंडिया या तीन कंपन्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये बाजार भांडवलामध्ये घसरण दर्शवली आहे तर दुसरीकडे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, इन्फोसिस, आयटीसी, भारती एअरटेल आणि बजाज फायनान्स यासारख्या कंपन्यांनी भांडवलामध्ये वाढ दर्शवली आहे.









