बेंगळूर : राज्यात पावसामुळे हानी झालेल्या भागात मदतकार्य हाती घेण्यासाठी राज्य सरकारने 777.50 कोटी रुपये मंजूर केले आहेत, अशी माहिती महसूल मंत्री कृष्णभैरेगौडा यांनी विधानसभेत दिली. विधानसभेत भाजप आमदारांच्या धरणे आंदोलनादरम्यान काँग्रेस आमदारांनी पावसामुळे नुकसानीचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी सरकारच्या वतीने महसूल मंत्री कृष्णभैरेगौडा यांनी उत्तर दिले. पावसामुळे हानी झालेल्या भागात मदतकार्य हाती घेण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांकरिता एकूण 777.50 कोटी रुपये मंजूर केले आहेत. आवश्यकता भासली तर आणखी निधी देण्यात येईल. निधीची कमतरता नाही. सर्वाधिक पाऊस होत असलेल्या भागात अलीकडेच 29 निवारा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. पावसामुळे संकटग्रस्त झालेल्यांना निवारा केंद्रांमध्ये भोजन, उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. आगामी दिवसांत अधिक पावसाची शक्यता गृहीत धरून केंद्राच्या राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण पथकाच्या 6 तुकड्या बेळगाव, किनारपट्टी आणि मलनाड भागात नियुक्त करण्यात आल्या आहेत.
Previous Articleविक्रमी प्रवासानंतर शेअरबाजारात नफा वसुली
Next Article अमेरिकेतील राजदूतपदी विनय क्वात्रा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









