सहकार मंत्री बाळासाहेब पाटील
कोल्हापूर
माझे शिक्षण कोल्हापुरात झाल्यानं माझं आणि कोल्हापूरचे नाते वेगळं आहे. कोल्हापुरातील सहकार चळवळ, मी जवळून पाहिले आहे. त्यामुळेच गावाकडे गेल्यावर मी सहकारी संस्थां, बँका आपल्या भागात सुरू केल्या. त्याचाच अनुभव म्हणून उपमुख्यमंत्री अजित दादांनी सहकार खात्याची जबाबदारी माझ्यावर दिली. देशाचे सहकार मंत्री अमित शहा यांचेही नेतृत्व सहकारी चळवळीतून तयार झालं आहे, तेही गुजरात मधील जिल्हा बँकेचे चेअरमन होते. महाराष्ट्राची देशात नव्हे तर जगात सहकार चळवळीचे केंद्र म्हणून ओळख आहे. असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. ते आज कोल्हापूर दौऱ्यावर असताना, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पुढे ते म्हणाले, नोकर निर्मितीत सहकार आघाडीवर आहे, याचं श्रेय विठ्ठलराव विखे, विलासराव देशमुख, यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण शंकरराव मेथे यांना जाते. सहकाराची 30 कोटी पर्यंत लोकं जोडली गेली आहेत. प्रत्येक घटक सहकार चळवळीशी जोडला गेला पाहिजे, दूध संस्था सहकारी संस्था सहकारी गृहनिर्माण संस्था अडचणीत असताना त्यांना प्रोत्साहन देणं हे आमचं काम आहे. मी अध्यक्ष म्हणून काम केला असल्याने पक्षाच्या कार्यालयाला भेट देण्यासाठी आलो आहे.
शिवभोजन थाळी विषयी बोलताना म्हणाले, शिवभोजन थाळी बंद करण्यासंदर्भात अजूनही विचार झालेला नाही.
सोयाबीन पिकाबद्दल म्हणाले, सोयाबीन अजूनही मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिला आहे, सरकारला सांगून सोयाबीन खरेदीमध्ये मुदतवाढ देण्याचा प्रयत्न करणार आहे,
सहकारी संस्था निवडणुका याविषयी बोलतान सहकार मंत्री म्हणाले, आता जेवढ्या निवडणुका लागल्या आहेत त्यापैकी सरकारने ठरवला आहे की कोणत्याही सहकारी संस्थेला मुदतवाढ द्यायची नाही, सहकारी कारखाना बँक सोसायटी यांना डेड लाईन दिली आहे त्या निवडणुका घ्यायचा सरकारने ठरवला आहे.
राज्यातील महायुती सरकार या निर्णयाबाबत सकारात्मक आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी गाय अनुदानाविषयी दिली.
सर्वात जास्त कर्जबाजारी शेतकरी पंजाब मध्ये आहे, पंजाबमध्ये कर्ज जास्त दिलं जातं, शेतकऱ्यांना ओटीएस बाबत परवानगी दिली आहे, शेतकऱ्यांना कर्जातून बाहेर काढण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्यांमध्ये कोल्हापूर, लातूर, पुणे, सांगली जिल्हे आहेत. सहकार खात्याकडे पैसे आहेत प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरच 50 टक्के अनुदान देण्यात येणार आहे, असे वक्तव्य त्यांनी शेतकरी कर्ज या विषयी दिली.
अंजली दमानिया यांच्या विषयी बोलताना मंत्री पाटील म्हणाले, आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत, आरोप सिद्ध झाल्यावर नेते कारवाई करतील.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








