दुकानवाड / वार्ताहर
दुकानवाड भागात मंगळवारी सकाळ पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दुकानवाड भागातील दुकानवाड, वसोली, वीरवाडी, शिवापूर ,चाळोबा येथील पुलं पाण्याखाली गेल्याने वसोली आंजिवडे शिवापूर वाहतूक ठप्प आहे.मंगळवारी सकाळी पावसाने जोर धरल्याने सखल असलेले दुकानवाड पुल पहिलेच पाण्याखाली गेले. त्यामुळे या भागातील वहातूक सकाळी १० वा. पासून बंद झाली. मंगळवार माणगाव बाजाराचा दिवस असल्याने बाजारासाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांचे हाल झाले तसेच शाळकरी मुलांनी गाडी घरीच जाणे पसंत केले.
सर्वच गाड्या टाळंबा येथून परत येत होत्या दिवसभर पुलावरुन पाणी जात असल्याने शिवापूर, वसोली आंजिवडे बसेस टाळंबा येथूनच परत येत असल्याने वसोली शिवापूर आंजिवडे वासियांना १२ ते १३ किमी पायपीट करत घर गाठावे लागले.आंबेरी पुलही पाण्याखालीमंगळवारी ४ वा.आंबेरी पुलावर पाणी येण्यास सुरुवात झाली रात्री उशीरा पर्यंत पाणी ओसरले नव्हते. यावर्षी आंबेरी नदीवर नवीन पुल झाल्याने वाहनधारकांनी या पूलाचा आश्रय घेतला सर्वच वाहतूक नवीन पुलावरून चालू होती दरवषी तासनतास प्रवाशांना या पुलावर थांबावे लागत होते. २७ गावांचा संपर्क तुटत होता शाळकरी मुलांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले व पुल मंजूर करून आज त्यावरुन वहातूकही सुरू झाली त्यामुळे ग्रामस्थांनी या दोघांचे आभार मानले.









