बेळगाव : अमरनाथ यात्रेला गेलेले बेळगावचे 35 यात्रेकरू अमरनाथ येथील दरड कोसळल्यामुळे तेथेच अडकून पडले आहेत. मात्र, आर्मी बेस कॅम्प येथे ते सर्वजण सुरक्षित आहेत. सदर प्रवासी बेळगावहून 28 जूनला मुंबईला गेले. तेथून 29 रोजी जम्मूतील तावी येथे पोहोचले. त्यानंतर त्यांनी वैष्णोदेवीचे दर्शन घेऊन पहलगाम मार्गे दि. 6 जुलै रोजी तेथून निघाले. तथापि, पुलवामापासून काही अंतरावर दरड कोसळल्याने त्यांचा परतीचा मार्ग बंद झाला. हे सर्वजण आर्मी बेस कॅम्प येथे सुरक्षित आहेत. रस्ता मोकळा होण्यास अजूनही दोन-तीन दिवस लागतील. दि. 7 जुलैपासून बेळगावचे यात्रेकरू या ठिकाणी अडकले असले तरी ते सुरक्षित आहेत. त्यामुळे काळजीचे कारण नाही, असे यात्रेकरूंपैकी सोमनाथ हलगेकर यांनी सांगितले.
Previous Articleशेतकरी संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांचे आभार
Next Article मोबाईल हॅक करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









