कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासदार राऊत यांचे आवाहन : परजिल्हय़ातून भाजीपाला आणण्यास मनाई : मालवणात लोकप्रतिनिधी, अधिकाऱयांची बैठक
वार्ताहर मालवण:
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने केलेल्या आवाहनाला सर्वसामान्यांनी चांगला प्रतिसाद दिला. लॉकडाऊनच्या काळात पोलीस, आरोग्य, महसूलसह अन्य प्रशासन, लोकप्रतिनिधींनी चांगले काम केले आहे. त्यामुळे कोकणात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मदत मिळाली. 3 मेपर्यंत लॉकडाऊन राहणार असून त्यापुढील काळ हा कसोटीचा असेल. चाकरमानी कोकणात मोठय़ा संख्येने येण्याची शक्मयता असल्याने शहरांमधील प्रवेशद्वारांवर कडक बंदोबस्त ठेवावा लागेल, असे खासदार विनायक राऊत यांनी मालवण पालिका कार्यालयात सांगितले.
मालवण दौऱयावर आलेल्या खासदार राऊत यांनी रविवारी पालिकेत प्रशासकीय अधिकाऱयांकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला. नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील, बबन शिंदे, हरी खोबरेकर, बाबी जोगी, नगरसेवक यतीन खोत, मंदार केणी, नगरसेविका आकांक्षा शिरपुटे, तृप्ती मयेकर, गणेश कुडाळकर, प्रवीण रेवंडकर, आतू फर्नांडिस, यशवंत गावकर, विकी चोपडेकर, नितीन तायशेटय़े आदी उपस्थित होते.
शहरात मुबलक भाजीपाला, फळे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रभावी उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. स्वयंसेवकांमार्फत घरपोच सुविधा दिल्या जात आहेत. मासळी लिलावाच्या ठिकाणी होणाऱया गर्दीवर नियंत्रण मिळविण्यातही यश मिळविले आहे. शहरात मुबलक प्रमाणात भाजीपाला, फळे उपलब्ध आहेत. परजिल्हय़ातून भाजीपाला आणण्यास मनाई करण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर उपलब्ध होणारा भाजीपाला नागरिकांनी खरेदी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शहरात दुचाकी वाहनांना बंदी करण्यात आली आहे. विनाकारण फिरणाऱयांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे, अशी माहिती अधिकारी वर्गाकडून देण्यात आली.
शहरातील प्रवेशद्वारांवर पोलीस बंदोबस्त आवश्यक!
प्रशासनाने केलेल्या आवाहनाला कोकणात सर्वसामान्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यानेच कोकण सुरक्षित राहिले आहे. यात अधिकारी, लोकप्रतिनिधींचेही चांगले सहकार्य मिळाले आहे. मात्र, यानंतरही गाफील राहून चालणार नाही. 3 मेपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. नंतर कोकणात चाकरमानी मोठय़ा संख्येने येण्याची शक्मयता आहे. त्यादृष्टीने आवश्यक ती खबरदारी घ्यावी लागणार आहे. शहरांमध्ये दाखल होण्याची जी प्रवेशद्वारे आहेत, त्याठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवणे आवश्यक आहे, असे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले.
डिझेल परताव्याची रक्कम परत मिळणार!
मत्स्य सोसायटय़ांच्या प्रतिनिधींनी डिझेल कोटय़ासंदर्भात खासदार राऊत यांचे लक्ष वेधले. डिझेल परताव्याची मंजूर झालेली रक्कम माघारी गेली असली, तरी वित्त विभागाकडून ती मत्स्य सोसायटय़ांना लवकरच उपलब्ध होईल. लॉकडाऊन काळात उद्योगधंदे बंद झाले असले, तरी ते येत्या काळात टप्प्याटप्प्याने सुरू होतील. यात जी अत्यावश्यक कामे मार्गी लावणे आवश्यक आहे, ती कामे सुरू होतील, असेही खासदार राऊत यांनी सांगितले.








