- बेळगाव / प्रतिनिधी
- पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत केंद्र सरकारने देशातील अल्पभूधारक शेतकऱयांना वर्षाला सहा हजार रुपये थेट शेतकऱयांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. जिल्हय़ातील 5 लाख 30 हजार 459 शेतकऱयांनी या योजनेसाठी नोंद केली आहे. त्यापैकी आतापर्यंत 4 लाख 89 हजार 264 शेतकऱयांना या योजनेचा लाभ झाला आहे.
- केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान योजना जाहीर केल्यानंतर शेतकऱयांनी या योजनेच्या समावेशासाठी संबंधित यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीचे अर्ज भरून दिले. मात्र, त्यातील काही अर्ज कागदपत्रांतील त्रुटांमुळे नाकारण्यात आले आहेत. त्यामुळे काही शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत. कृषी खाते व संबंधित विभागाकडून योजनेपासून वंचित असलेल्या शेतकऱयांची माहिती अपलोड करण्याचे काम सुरू आहे.
- मात्र, तालुक्मयातील बरेच शेतकरी अद्यापही या योजनेच्या समावेशापासून वंचित आहेत. त्यासाठी कागदपत्रांतील त्रुटी, माहिती न जुळणे, आधारकार्ड नंबर चुकणे, बँक पासबुक खाते नंबर चुकणे आदी त्रुटी कारणीभूत असल्याची संबंधित खात्याकडून माहिती उपलब्ध झाली आहे. ज्या शेतकऱयांना या योजनेचा लाभ मिळाला नाही ते अद्याप या योजनेच्या प्रतीक्षेत आहेत.
- योजनेत अधिकाधिक शेतकऱयांना समाविष्ट करण्यासाठी ग्राम पंचायत, ग्राम पंचायत कर्मचारी, तलाठी, कृषी विभाग यांच्याकडून काम सुरू करून अल्पभूधारक शेतकरी कुटुंबाची माहिती ऑनलाईन पद्धतीने भरण्यात आली. मात्र, कागदपत्रांतील त्रुटी, माहिती न जुळणे, आधारकार्ड नंबर चुकणे, पासबुक खाते नंबर चुकणे आदी कारणांनी अनेक शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे या शेतकऱयांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
- योजनेतील पात्र शेतकऱयांना प्रतिवषी 6 हजार रुपये, दर चार महिन्याला 2 हजार रुपयांप्रमाणे तीन टप्प्यात ही रक्कम शेतकऱयांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येत आहे. मात्र, हा लाभ मिळत असताना काही शेतकरी तिन्ही, काहींना दोन तर काहींना पहिला हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे योजनेबाबत लाभ अल्पभूधारक व गरीब शेतकऱयांना मिळणार की नाही अशी चर्चा शेतकरी वर्गातून होत आहे. त्यामुळे शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळणार की नाही या चिंतेत आहेत.
- जे शेतकरी अद्यापही या योजनेस पात्र ठरलेले नाहीत त्यांची माहिती पुन्हा नव्याने भरण्याचे काम सुरू आहे. आवश्यक दुरुस्ती करून माहिती अपलोड करून व्हेरिफिकेशन केले जात आहे. सर्व शेतकऱयांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. येत्या काही दिवसांत योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱयांना या योजनेत समाविष्ट करण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. काही शेतकऱयांनी लाभ मिळावा यासाठी दोन ते तीन वेळा कागदपत्रे जमा केली होती. पण अजूनही त्यांची यादीत नावे आली नाहीत. त्यामुळे पुन्हा नव्याने कागदपत्रे जमा केली आहेत. यादीत नाव समाविष्ट व्हावे आणि योजनेचा लाभ मिळावा यासाठी शेतकऱयांची धडपड सुरू आहे
Previous Articleकॅन्टोन्मेंट आकारणार पार्किंग शुल्क
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








