20 टक्के डोस वाया : रत्नागिरी, दापोलीत उदासिनता ; आरोग्य कर्मचाऱ्यांचेच समुपदेशन करण्याची गरज
प्रतिनिधी / रत्नागिरी
कोरोना लसीकरणाबाबत अद्यापही आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था दिसून येत आहे. जिह्यात रत्नागिरी, दापोली वगळता इतर तालुक्यांत लसीकरणाला तुलनेने चांगला प्रतिसाद मिळत असला तरीही 40 टक्के आरोग्य कर्मचाऱयांनी लसीकरणाला नकारघंटा दर्शवली आहे. त्यामुळे दररोज कर्मचाऱ्यांचेच समुपदेशन करण्याची वेळ आल्याबद्दल जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
जिह्यामध्ये कोविड लसीचे 16 हजार 330 डोस उपलब्ध झाले आहेत. पहिल्या टप्प्यात दीड हजार कर्मचाऱयांना लस देण्यासाठी यादी तयार केली आहे. मुळात दिवसाला 500 कर्मचाऱयांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. शुक्रवारी 297 कर्मचाऱयांनीच लस घेतली. आतापर्यंत जिल्हÎात एकूण 1 हजार 94 कर्मचाऱयांना लस दिली आहे. हा प्रतिसाद आणखीन वाढणे आवश्यक असल्याने वारंवार समुपदेशन केले जात आहे. रत्नागिरी तालुका आणि दापोलीत अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे डॉ. फुले यांनी सांगितले.
डॉ. संघमित्रा फुले यांनीही घेतली कोरोना लस
लसीकरणाच्या पहिल्या दिवशी डॉ. संघमित्रा फुले यांची तब्येत बरी नव्हती त्यामुळे त्यांनी लस घेतली नव्हती, मात्र शुक्रवारी त्यांनी लस घेतली. आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास नसल्याचे त्यांनी सांगितले. बहुतांश कर्मचारी स्वत:हून लस घेत असताना 40 टक्के कर्मचाऱयांमध्ये याबाबत उदासीनता दिसून येत आहे, असे त्यांनी सांगितले.
चौकट …
लसीची एक्सपायरी डेट एप्रिलमध्ये
कोरोना लसीकरणासाठी दहा लसीचा लॉट असतो. लस उघडल्यावर एकाचवेळी दहा जणांना ती द्यावी लागते. हा दहाचा लॉट चार तासाच्या आत संपवयाचा असतो. मुळात लसींची एक्सपायरी डेट एप्रिलमध्ये आहे. जिह्यात आजपर्यंत चारवेळा झालेल्या लसीकरणात एकावेळी आवश्यक असलेले कर्मचारी उपस्थित नसल्याने सुमारे 20 टक्के लस वाया गेल्याची माहिती समोर आली आहे.









