एकाच दिवशी शेकडो गावात आंदोलन
पंधरा हजार स्त्री-पुरुषांचा सहभाग
प्रतिनिधी / सातारा
हाथरस मधील मनीषा वाल्मिकी या मुलीवर बलात्कार करून अत्यंत क्रूरपणे तिची हत्या करण्यात आली. राज्यसरकार आणि प्रशासन या आरोपींना पाठीशी घालत आहे. मनीषा वाल्मीकिवर झालेला बलात्कार, त्यानंतर तिची जीभ छाटने, तिच्यावर मध्यरात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. या साऱ्या घटना संशयास्पद आहेत.

‘श्रमिक मुक्ती’ दलाचे राज्यव्यापी आंदोलन
खरं तर ही घटना केवळ बलात्काराची नाही तर त्यामागे जातवर्चस्व आणि जातीय अहंकार आहे. मनीषा वाल्मीकीच्या गुन्हेगारांना शिक्षा होऊन तिला न्याय मिळाला पाहिजे पण याबरोबरच जातीय आणि स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना थांबायच्या असतील तर उतरंडीची जातीव्यवस्था संपली पाहिजे. तिच्या अंताची चळवळ तीव्र केली पाहिजे तरच या घटना कायमच्या थांबणार आहेत. म्हणून जाती अंताची चळवळ तीव्र करण्याचा निर्धार श्रमिक मुक्ती दलाने केला आहे.
आज राज्यभर डॉ. भारत पाटणकर, कॉ. संपत देसाई, डॉ. प्रशांत पन्हाळकर, मोहन अनपट, चैतन्य दळवी, डी के बोडके, मेजर बन, संतोष गोटल यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. गावागावात आंदोलक आपापल्या दारात आंदोलनासाठी बसले होते. एकाचवेळी राज्यभरात शेकडो गावात हे वेगळे आंदोलन झाले.









