वार्ताहर/कास
सातारा जिल्ह्यात काल, बुधवारी मध्यरात्री पासुन मुसळधार पाऊस सुरु आहे. या मुसळधार पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणारा कास तलाव पुर्ण क्षमतेने भरला. आज, गुरूवारी दुपारी तलावातील पाणी ओव्हरफ्लो होऊन सांडव्यावरून वाहू लागले.
सातारा शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शहराला मोठया प्रमाणात मुबलक पाणी साठा उपलब्ध होण्यासाठी गेल्या तिन वर्षापासुन कास तलावच्या भिंतीची उंची वाढविण्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. मात्र हे काम यावर्षी पुर्ण न झाल्याने धरणाची पाणी साठवण क्षमता जैसे थेच ठेवली आहे.
मध्यरात्रीपासुन पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तलावच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. गुरूवारी दुपारी धरण ओव्हरप्लो झाले सांडव्यावरुन पाणी वाहु लागल्याने सातारकारांच्या पुढील वर्षाच्या पाणी साठयाची चिंता मिटली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









