वार्ताहर / भिलवडी
कृष्णा नदी पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून, औदुंबर येथील दत्त मंदिरा मध्ये पाणी शिरले आहे. तर नागठाणेचा बंधारा देखील पाण्याखाली गेला आहे. कृष्णा नदी पाणी पातळीत झपाट्याने होत असलेली वाढ पाहता, नदीकाठावरील नागरिकांमध्ये महापुराबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदी पाणी पात्रामध्ये झपाट्याने वाढ होत असून, श्री क्षेत्र औदुंबर – अंकलखोप येथील श्री दत्तमंदिरामध्ये रविवारी सकाळी पाण्याने प्रवेश केला. त्याचबरोबर भिलवडी येथील कृष्णा घाटासमोरील दोन्ही मंदिरे पाण्याखाली गेली असून नागठाणे येथील बंधाराही शनिवारी रात्री पाण्याखाली गेला आहे. पाणी पातळीत होणारी वाढ पाहता श्री दत्त देवस्थान सुधार समितीने श्रींची मुर्ती जुने मंदिर देवघरात ठेवली असून, श्रींच्या सर्व धार्मिक विधी तेथेच करण्यात येणार आहेत. अशी माहिती देवस्थान सुधार समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
Previous Articleसांगली : सातत्याने पाठपुरावा केल्याने जतला म्हैसाळ योजनेचे पाणी
Next Article कणेरी पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरला








