ऑनलाईन टीम / अहमदाबाद
गुजरातचे उपमुख्यमंत्री नितिन पटेल यांनी संविधान, कायदा आणि धर्मनिरपेक्षतेबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. संविधान, धर्मनिरपेक्षता आणि कायदा या गोष्टी हिंदू बहुसंख्यांक असतील तोपर्यंतच टीकतील असं मत पटेल यांनी व्यक्त केले आहे. हिंदू समाज अल्पसंख्यांक झाल्यानंतर हे काहीच शिल्लक राहणार नाही असेही ते यावेळी म्हणाले. पटेल यांनी गांधीनगरमधील भारत माता मंदिरमध्ये बोलताना काल, शुक्रवारी हे वादग्रस्त विधान केले आहे.
विश्व हिंदू परिषदच्या वतीने मूर्ति प्रतिष्ठापना महोत्सव आयोजित एका कार्यक्रमात बोलताना पटेल यांनी “देशामध्ये काही लोक संविधान, धर्मनिरपेक्षतेसंदर्भात बोलतात. मात्र आज तुम्ही हा व्हिडीओ रेकॉर्ड करायचा तर करा किंवा माझे शब्द लिहून ठेवा पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की जोपर्यंत हिंदू बहुसंख्यांक आहेत तोपर्यंतच संविधान, धर्मनिरपेक्षता आणि कायदा या गोष्टी भारतामध्ये अस्तित्वात असतील. ज्या दिवशी हिंदूंची संख्या कमी होईल आणि दुसऱ्यांची वाढू लागले तेव्हा धर्मनिरपेक्षता, लोकसभा, संविधान काहीच वाचणार नाही असे विधान केले.
तर, पुढे बोलताना ते म्हणाले “मी सरसकट सर्वांबद्दल हे वक्तव्य करत नाही. मला हे सांगावेसे वाटतेय की लाखो मुस्लीमही देशभक्त आहेत. लाखे ईसाई देशभक्त असल्याचेही ते म्हणाले. राज्यामधील वादग्रस्त धर्मांतरविरोधी कायदा म्हणजेच गुजरात फ्रीडम ऑफ रिलिजन अधिनियम २०२१ बद्दलही त्यांनी यावेळी मत व्यक्त केलं. या कायद्या विरोधात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यानंतर उच्च न्यायलयाने हा कायदा लागू करण्यावर तात्पुरती स्थगिती आणलीय. गुजरात सरकार या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायलयात जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले.
Previous Articleमहाराष्ट्रात गेल्या 24 तासात 4,654 नवे रुग्ण ; 170 मृत्यू
Next Article बेळगावात गोवा बनावटीची दारू जप्त









