मुंबई \ ऑनलाईन टीम
राज्यात जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा मदतकार्य होणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे कोणत्याही नेत्यानं प्रसंगावधान राखलं पाहिजे. अशा प्रकारचे दौरे केल्याने यंत्रणा त्यांच्यासाठी फिरवावी लागते. ते योग्य नाही. त्यामुळे ज्यांचा या भागाशी दैनंदिन संबंध नाही त्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा टाळावा, असं आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं आहे.
राज्यातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आवाहन केलं. यावेळी शरद पवार म्हणाले की, माझा पूर्वीचा अनुभव, विशेषत: लातूरच्या वेळचा अनुभव आहे. अशा घटनांनंतर अनेक लोक गाड्या घेऊन त्या ठिकाणी जातात. माझं आवाहन आहे. आता शासकीय यंत्रणा पूनर्वसनाच्या कामात व्यस्त आहेत. त्यांचे लक्ष विचलित होईल, त्यामुळे असे दौरे टाळावेत. मी लातूरला असताना, आम्ही सगळे जण कामात होतो, पंतप्रधान येत होते. त्यामुळे मी पंतप्रधानांना सांगितलं दहा दिवस येऊ नका. तुम्ही आला तर यंत्रणा तिकडे लावावी लागेल मला आनंद आहे, माझी विनंती मान्य केली गेली ते दहा दिवसांनंतर आले. त्यामुळे कोणत्याही नेत्यंनी प्रसंगावधान राखावं, मी सुद्धा आता दौऱ्यावर जात नाही. त्याचं कारण बाकीची यंत्रण फिरवावी लागते. आपल्या भोवती यंत्रणा ठेवणं योग्य नाही. दौरे होत आहेत त्याने धीर मिळतो. पण दौऱ्यामुळं शासकीय यंत्रणेचं काम वाढतं. त्यामुळं दौरे होऊ नये असं मला वाटतं. दौऱ्याला गेल्यामुळे यंत्रणेला त्रास होतो, असंही शरद पवार म्हणाले.
राज्यातील पूरग्रस्त १६ हजार कुटुंबांना अतिवृष्टीचा खूप मोठा फटका बसला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीनं येत्या दोन ते तीन दिवसांत पूरग्रस्तांना १६ हजार किट्सचं वाटप केलं जाणार असल्याची माहिती शरद पवार यांनी यावेळी दिली. तसेच राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान झालं आहे. या जिल्ह्यांना तातडीनं मदत मिळणं गरजेचं आहे. काल राज्य सरकारनं काही मदत जाहीर केली आहे. ते त्यांच्या कार्यक्रमानुसार नक्कीच मदत करतील, असं देखील शरद पवार म्हणाले.
Previous Articleचीनचा WHO विरोधात आक्रमक पवित्रा
Next Article सांगली-कोल्हापूर राज्यमार्गावरील वाहतूक सुरु








