बेळगाव : शाळेच्या स्वच्छतेचे काम प्रगतिपथावर असून शाळांच्या नववर्षाचे आगमन सॅनिटायझर्स आणि मास्क देऊनच करण्यात येणार आहे. शाळांच्या निर्जंतुकीकरणाची जबाबदारी मनपाकडे देण्यात आली आहे. त्यानुसार शाळांच्या वर्गखोल्यांची स्वच्छता, शाळेच्या मैदानाची स्वच्छता, बाक पुसणे तसेच पाण्याने शाळा धुऊन काढणे हे काम प्रगतिपथावर असून सर्वच शाळांमध्ये हे चित्र पाहायला मिळत आहे. तब्बल दहा महिन्यानंतर शाळा खुल्या होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने शिवाय शाळेच्या स्वच्छतेच्यादृष्टीने वर्षाखेरीला शाळास्तरावर स्वच्छतेलाच प्राधान्य दिले जात आहे. दरवर्षी शाळेचा प्रारंभोत्सव प्रामुख्याने शाळेची स्वच्छता करण्यातच निघून जातो. विद्यार्थ्यांच्या सहभागातून शाळेची स्वच्छता करण्याबरोबरच पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाते. मात्र, यंदा विद्यार्थ्यांचे स्वागत थर्मल स्क्रिनिंग करून, सॅनिटायझर्स व मास्क देऊन करण्यात येणार आहे. यामुळे सध्या शाळास्तरावर स्वच्छतेला प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून येत आहे. वर्गनिहाय विद्यार्थ्यांची मर्यादा असल्याने बैठक व्यवस्था बदलून अचूक बैठक व्यवस्था करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे यंदा प्रथमच नववर्षाच्या स्वागताची तयारी जोरदार सुरू आहे.
Previous Articleमहावीर को-ऑप.बँकेची सर्वसाधारण सभा उत्साहात
Next Article जमखंडीत विजयी समर्थकांचा जल्लोष
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









