वार्ताहर / आळते
श्री. प्रभु रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या आळते ( ता. हातकणंगले ) डोंगरातील रामलिंग मंदिराच्या परिसरातील जल व माती अयोध्या येथे राम मंदिराच्या पायाभरणीसाठी पाठविण्यात येणार आहे. प्रभु रामचंद्र यांचे वनवास काळामध्ये येथे काही काळ वास्तव्य होते . त्याकाळी प्रभुंनी डोंगरात धनुष्यबाण मारून पाण्याचा जिवंत झरा काढला होता. तेंव्हापासुन आजतागायत झऱ्यातुन पाण्याचा उमाळा सुरू आहे .
याच झऱ्याचे पाणी येथील माती सोमवारी सकाळी अकरा वाजता रामलिंग येथील शिवपिंडीला अभिषेक घालून अयोध्येकडे रवाना करण्यात येणार आहे. प्रभू रामचंद्र चौदा वर्षे वनवासात असताना हा परिसर त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. येथील शिवलिंगाची त्यांनी स्थापन केली असून पूजेसाठी त्यांनी मारलेल्या धनुष्यबानातून शिवपिंडीवर सतत जलाभिषेक होत असतो .
पाच ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराची पायाभरणी होत आहे. यासाठी देशभरातून ऐतिहासिक भूमीवरील जल व माती संकलित केली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील रामलिंग या ऐतिहासिक भूमीतून सोमवारी जल आणि माती पाठवण्यात येत आहे . भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष मा . आमदार सुरेश हाळवणकर जिल्हा परिषदेतील भाजपाचे गटनेते अरुणराय इंगवले यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे . प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामार्फत हे जल व माती आयोध्येला पाठवण्यात येणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








