ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या ट्रस्टच्या अध्यक्षपदी सरसंघचालक मोहन भागवत यांची नियुक्ती करा, या मागणीसाठी बिलारीडीह येथे तपस्वी छावणीचे संत महंत परमहंस दास उपोषणाला बसले आहेत.
अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या ट्रस्टच्या अध्यक्षपदी के. परासरन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे दास नाराज आहेत. परासरन हे चांगले व्यक्ती आहेत. मात्र, आरएसएसची विचारधारा राष्ट्रवादी आहे. त्यामुळे संघप्रमुखांचा सन्मान व्हायला हवा. जोपर्यंत मोहन भागवतांची या ट्रस्टच्या अध्यक्षपदी नेमणूक होत नाही, तोपर्यंत आपण उपोषण करणार असल्याचे दास यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारने गठीत केलेल्या 15 सदस्यीय समितीत 9 स्थायी सदस्य आणि सहा सदस्य नियुक्त करण्यात येणार आहेत. या समितीच्या अध्यक्षपदी सध्या परासरन विराजमान आहेत.









