केवळ एकच विद्यार्थी अनुतीर्ण : राज्यात बेंगळूर उत्तर शैक्षणिक जिल्हा अव्वल
प्रतिनिधी /बेंगळूर
उlकंठा शिगेला पोहोचलेल्या राज्यातील दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी जाहिर झाला. 99.999 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. केवळ एकच विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला आहे. जिल्हानिहाय निकालात बेळगाव शैक्षणिक जिल्हा 24 व्या स्थानावर तर चिकोडी शैक्षणिक जिल्हा 23 व्या स्थानावर आहे. बेंगळूर उत्तर शैक्षणिक जिल्हय़ाने अग्रस्थान पटकावले आहे तर बळ्ळारी जिल्हा शेवटच्या स्थानावर राहिला आहे. कोरोना पाfरस्थितीमुळे तीव्र विरोध असताना देखील 19 आणि 22 जुलै रोजी राज्यभरात परीक्षा घेण्यात आली होती.
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी बेंगळूरमध्ये पत्रकार पाfरषदेत दहावी परीक्षेचा निकाल जाहिर केला आहे. राज्यात प्रथमच परीक्षा पद्धतीत बदल करून बहुपर्यायी प्रÍनोत्तराच्या स्वरुपात परीक्षा घेण्यात आली होती.
विद्याथ्याना मिळालेल्या गुण आणि त्याच्या आधारे ग्रेड देण्यात आले आहेत. बहुतेक सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर 9 टक्के विद्याथ्याना ग्रेस मार्क देऊन उत्तीर्ण करण्यात आले आहे.
कोरोना पाfरस्थितीमुळे राज्यात बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे दहावीच्या परीक्षाहि रद्द होतील, अशी अनेकांची समजूत झाली होती. मात्र, विद्याथ्या¥चे भवितव्य आणि पुढील शैक्षणिक प्रवेशात अडचणी उद्भवू नयेत यासाठी कोणत्याहि पाfरस्थितीत परीक्षा घेण्याच्या निर्णयावर तत्कालिन शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार ठाम होते. 2019-20 या शैक्षणिक वर्षात दहावी परीक्षेसाठी केलेल्या ठोस उपाययोजनांप्रमाणेच यंदा देखील अत्यंत सुरक्षा व्यवस्थेत परीक्षा घेण्यात आली होती. प्रÍनपत्रिकेचे स्वरुपहि बदलण्यात आले होते. जुलै 19 आणि 22 रोजी परीक्षा घेण्यात आली. प्रथम, द्वितीय, तृतीय भाषा विषयांचा 120 गुणांचा एक पेपर आणि गणित, विज्ञान, समाज विषयांचा 120 गुणांचा दुसरा पेपर अशी एकूण 240 गुणांची परीक्षा घेण्यात आली होती. प्रत्येक विषयांना 40 पैकी मिळालेल्या गुणांचे 100 टक्के गुणांमध्ये रुपांतर करून निकाल जाहिर करण्यात आला आहे. जिल्हय़ाbचा निकाल यंदा टक्केवारीत न देता श्रेणी स्वरुपात जाहिर करण्यात आला आहे. सर्व 34 शैक्षणिक जिल्हय़ाbना अ श्रेणी मिळाली आहे.
दहावी परीक्षेला एकूण 8,76,581 विद्याथ्या¥नी नोंदणी केली होती. त्यापैकी 4,72,643 विद्यार्थी आणि 4,01,282 विद्यार्थिनी उत्ताrर्ण झाल्या आहेत. 90 टक्क्यांपेक्षा अधिक म्हणजेच अ+ श्रेणीत 1,28,931 विद्यार्थी उत्ताrर्ण झाले आहेत. तर 2,50,317 विद्यार्थी अ श्रेणीत उत्ताrर्ण झाले आहेत. 2,87,684 विद्यार्थी ब श्रेणीत आणि 1,13,610 विद्यार्थी क श्रेणीत उत्ताrर्ण झाले आहेत. क श्रेणीत उत्तीर्ण झालेल्यापैकी 9 टक्के विद्याथ्याना ग्रेस मार्क देऊन उत्तीर्ण करण्यात आले आहे. 13 विद्याथ्याना कमाल 28 ग्रेस मार्क देऊन उत्तीर्ण करण्यात आले आहे. यंदा 156 विद्याथ्याना शंभर टक्के म्हणजेच 625 पैकी 625 गुण मिळाले आहेत. तर प्रथम भाषा विषयात 25,702 विद्याथ्या¥ना 125 पैकी 125 गुण मिळाले आहेत.
कोणीहि प्रवेशापासून वंचित राहणार नाहि
यंदा दहावी परीक्षा दिलेले 8.76 लाख विद्यार्थी उत्ताrर्ण झाले आहेत. राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित आणि खासगी पदवीपूर्व महाविद्यालये, आयटीआय महाविद्यालयांमध्ये 12 लाख विद्याथ्याना प्रवेश देता येणार आहे. त्यामुळे कोणत्याहि विद्याथ्या&ला महाविद्यालयीन प्रवेशापासून वंचित रहावे लागणार नाहि. पदवीपूर्व महाविद्यालये सुरू करण्यासाठी अनेक शिक्षण संस्थांनी परवाना मिळविण्यासाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे विद्याथ्या¥नी प्रवेशाबाबत गोंधळून जाण्याची आवश्यकता नाहि, असे स्पष्टीकरण शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी दिले आहे.
वेबसाईट् ‘क्रॅश
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी सोमवारी दुपारी 3:30 वाजता दहावीचा निकाल जाहिर केल्यानंतर शिक्षण खात्याने उपलब्ध करून दिलेल्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी एकाच वेळी तुटून पडले. त्यामुळे तांत्रिक समस्या निर्माण झाली. पाfरणामी अनेक जणांमध्ये गोंधळ उडाला. अखेर शिक्षण खात्याने पर्यायी वेबसाईट्स उपलब्ध करून दिल्या. सुमारे तीन तासांनंतर सर्व वेबसाईट सुरळीतपणे कार्यरत झाल्या.
बोगस विद्यार्थी पाठविणारा नापास दहावी परीक्षेत एका विद्याथ्याने आपल्याऐवजी दुसर्याला पाठवून दिले होते. तपासणीवेळी बोगस विद्यार्थी सापडला. त्यामुळे आपल्याऐवजी दुसर्याला परीक्षेसाठी पाठवून देणार्या विद्याथ्या&ला नापास करण्यात आले आहे, अशी माहितीहि शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे.









